Wednesday 12 April 2023

प्रसिदध पुस्तके

Famous Books and It's Author 

प्रसिद्ध पुस्तके व लेखक

जगातील प्रसिद्ध पुस्तके व लेखक

World's Famous Books and It's Author 

1. 'वॉर ॲण्ड पीस' (युद्ध आणि शांतता) हे पुस्तक लिओ टॉलस्टॉय यांनी लिहिले. 

2. 'इलियड' या महाकाव्याचा निर्माता - होमर

3. 'लेस मिझरेबल्स' या पुस्तकाचे लेखक- व्हिक्टर ह्यूगो

4. '१९८४' हे पुस्तक जॉर्ज ऑरवेल यांनी लिहिले. 

5. 'अम्बॅसॅडर्स जर्नल' चे लेखक - जे. के. गालब्रेथ

6. 'द टेल ऑफ टू सिटीज' चे लेखक - चार्लस् डिकेन्स

7. 'एशियन ड्रामा' गुन्नार मिरदाल यांनी लिहिला.

8. 'द नेशन ऑफ मास पॉव्हर्टी' या पुस्तकाचे लेखक - जे. के. गालब्रेथ 

9. 'हॅम्लेट' या नाटकाचा कर्ता- शेक्सपिअर

10. 'मिसेस् गांधी' या पुस्तकाचे लेखक - डॉम मोरेंस 

11. 'फ्रिडम ॲट मिडनाईट' चे लेखक- लॅपिरे व कॉलीन्स

12. 'झुल्फी माय फ्रेंड' चे लेखक - पिलू मोदी

13. 'माईन काम्फ' हे आत्मचरित्र हिटलरने लिहिले.

14. 'फास्ट' ह्या ग्रंथाचे लेखक-गटे 

15. 'डेविड कॉपर फिल्ड' हे पुस्तक चार्लस् डिकेन्स यांनी लिहिले.

16. 'अन टू द लास्ट' या पुस्तकाचा लेखक - जॉन रस्कीन

17. 'पीपल्स पॉवर' ह्या पुस्तकाचे लेखक - टोनी गिल्सन

18. 'क्राईम ॲण्ड पनिशमेंट' या पुस्तकाचे लेखक- एम. डोस्टोव्हस्की

19. 'दास कॅपिटल' हा ग्रंथ कार्ल मार्क्सने लिहिला.

20. 'ॲना कॅरेनीना' या पुस्तकाचे लेखक- लिओ टॉलस्टॉय

21. 'डॉक्टर झिर्योगो' हे पुस्तक बोरिस पास्तरनाकने लिहिले.

22. 'ॲफ्ल्यूएंट' सोसायटी या पुस्तकाचे लेखक- जे. के. गालब्रेथ

23. 'द गुड अर्थ' या पुस्तकाचा लेखक - पर्ल बक 

24. 'कम्युनिस्ट मॅनिफैस्टो' चे लेखक- कार्ल मार्क्स

25. 'If I assassinated' या पुस्तकाचे लेखक-झुल्फिकार अली भुट्टो 

26. 'आई' या महान कादंबरीचे लेखक मॅक्झिम गॉर्की आहेत.

27. 'हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी' हा ग्रंथ बी. रसेल यांनी लिहिला. 

28. 'ओरिजिन ऑफ स्पेसिस ' हे पुस्तक चार्ल्स डार्विन यांनी लिहिले.

भारतातील प्रसिद्ध पुस्तके व लेखक

India's Famous Books and It's Author 



1. 'रामायण' त्या महाकाव्याचे लेखक वाल्मिकी ऋषीं आहेत.

2. 'महाभारत' या महाकाव्याची रचना वेद व्यासांनी केली.

3. 'अर्थशास्त्र' हया ग्रंथाचे लेखक - कौटिल्य

4. 'नाट्यशास्त्र' हा ग्रंथाची रचना भरतमुनींनी केली.

5. 'दयाभागा' ही मनुस्मृतीवरील टीका जीमूत बाहनांनी लिहिली.

6. 'मृच्छकटिक' शुद्रकाने लिहिले. 

7. 'मुद्राराक्षस' चे लेखक- विशाखादत्त

8. 'शाकुंतल' ची रचना कालिदासाने केली.

9. 'स्वप्नवासवदत्ताचे' लेखक - व्यास

10. 'पंचतंत्र' विष्णु शमनि लिहिले.

11. 'बुद्धचरित' हया ग्रंथाचा कर्ता - अश्वघोष

12. 'मेघदूत' ची रचना कालिदासाने केली. 

13. 'हर्षचरित' ची रचना बाणभट्टाने केली.

14. 'कादंबरी' हे पुस्तक बाणभट्टाने लिहिले.

15. 'गीत गोविंद' ची रचना जयदेवांनी केली.

16. 'रामचरित्रमानस' ह्या ग्रंथाचे लेखक -तुलसीदास 

17. 'शाहनामा' चा लेखक-फिर्दोसी

18. 'ऐन-ए-अकबरी' चा लेखक - अबुल फजल

19. 'उत्तररामचरित' हा ग्रंथ भवभूतीने लिहिला.

20. 'सुरसागर' या काव्याची रचना सुरदासने केली. 

21. 'अकबरनामा' अबुल फजलने लिहिला.

22. 'गुरूग्रंथसाहिब' या ग्रंथाचे रचनाकार - गुरू अर्जुनदेव

23. 'सत्यार्थप्रकाश' चे लेखक- स्वामी दयानंद सरस्वती

24. 'गीतांजली' चे लेखक रवींद्रनाथ टागोर

25. 'कुमुदिनी' चे लेखक - रवींद्रनाथ टागोर

26.'माझे सत्याचे प्रयोग' या ग्रंथाचे लेखक - महात्मा गांधी

27. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ पंडित नेहरूंनी लिहिला.

28. 'इंडिया ॲण्ड द वर्ल्ड' हे पुस्तक पंडित नेहरूंनी लिहिले. 

29. 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' हे पुस्तक पंडित नेहरूंनी लिहिले.

30. 'इंडिया विन्स फ्रिडम' हे पुस्तक मौलाना आझादांनी लिहिले. 

31. 'इंडिया डिव्हायडेड' चे लेखक डॉ. राजेंद्र प्रसाद आहेत.

32. 'हिंदू व्ह्यूव ऑफ लाईफ' चे लेखक - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

33. 'ईस्ट ॲण्ड बेस्ट' चे लेखक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत. 

34. 'आय फॉलो दि महात्मा' हे पुस्तक के. एम. मुन्शींनी लिहिले. 

35. 'कल्की' हा पुस्तकाचा लेखक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

36. 'आनंदमठ' या कादंबरीचे लेखक- बंकिमचंद्र चटर्जी

37. 'माय टूथ' चे लेखक- इंदिरा गांधी

38. 'इटर्नल इंडिया' चे लेखक इंदिरा गांधी आहेत.

39. 'नेचर क्युअर' हे पुस्तक मोरारजी देसाईंनी लिहिले. 

40. 'प्रिझन डायरी' जयप्रकाश नारायण यांनी लिहिली.

41. 'कुली' चे लेखक मुल्कराज आनंद आहेत.

42. 'इंडिया आफ्टर नेहरू' चे लेखक कुलदीप नायर आहेत.

43. 'द जजमेंट' हे पुस्तक कुलदीप नायरांनी लिहिले.

44. 'चिदंबरा' चे लेखक सुमित्रानंदन पंत आहेत.

45. 'फोर्टी नाईन डेज' चे लेखक- अमृता प्रितम

46.'डेथ ऑफ ए सिटी' हे पुस्तक अमृता प्रितम यांनी लिहिले.

47. 'कागज के कॅनवॉस' हे पुस्तक अमृता प्रितम यांनी लिहिले.

48. 'पांडवगौरव' चे लेखक- दीनबंधु मित्र

49.'गणदेवता' चे लेखक ताराशंकर बंडोपाध्याय आहेत.

50. 'द व्हेन्डर ऑफ स्वीटस डार्करूम' चे लेखक आर. के. नारायण आहेत.


51. 'द गाईड' या पुस्तकाचे लेखक आर. के. नारायण

52. 'नो माय सन' चे लेखक डी. आर. मंकीकर आहेत. 

53. 'पंचवटी' हे पुस्तक मैथिलीशरण गुप्त यांनी लिहिले.

54. 'यशोधरा' हे पुस्तक मैथिलीशरण गुप्त यांनी लिहिले.

55. 'मदर इंडिया' चे लेखक- कॅथरीन मेयो

56. 'ब्लड बाथ इन बांगला देश' चे लेखक - प्रबोध चंद्र

57. 'देवदास' या कादंबरीचे लेखक- शरदचंद्र चटर्जी

58.'गुलिस्तान' शेख सादीने लिहिले.

59. 'अवर इंडिया' चे लेखक- मिनू मसानी

60. 'संजय गांधी' हे पुस्तक मनेका गांधींनी लिहिले.

61. 'इंडिया फ्रॉम कर्झन टू नेहरू अँड आफ्टर' या पुस्तकाचे लेखक - दुर्गादास 

62. 'रोझेस इन डिसेंबर' चे लेखक- एम. सी. छागला

63. 'पॉलिटिक्स आफ्टर फ्रिडम' चे लेखक- मधू लिमये 

64. 'वन डे वंडर्स' या पुस्तकाचे लेखक-कपिल देव

65. 'जीवनयात्रा' हे झैलसिंगांचे आत्मचरित्र आहे. 

66. 'प्रेसिडेन्ट ॲण्ड दी कॉन्स्टीट्यूशन' हे पुस्तक वाल्मीकी चौधरींनी लिहिले.

67. 'अकाली-पत्रिका' हे दैनिक पंजाबी भाषेत प्रसिद्ध होते.

68. 'इंदिरा गांधी रिटर्नस्' चे लेखक खुशवंत सिंग आहेत.

69. 'अनटोल्ड स्टोरी' हे पुस्तक बी. एम. कौल यांनी लिहिले. 

70. 'हिमालयन ब्लंडर' चे लेखक - ब्रिगेडियर दळवी

71. 'क्रिकेट माय स्टाईल' या पुस्तकाचे लेखक-कपिलदेव

72. 'ब्लॅक ॲण्ड व्हाईट' या पुस्तकाचे लेखक- शिवा नायपाल

73. 'अवर फिल्मस-देअर फिल्मस' चे लेखक - सत्यजित रे

74. 'इंदिरा गांधी-प्रॉमिसेस टू किप' या पुस्तकाचे लेखक- विष्णुदत्त

75. 'मोरारजी पेपर्स' ह्या पुस्तकाचे लेखक - अरूण गांधी

76. 'शांतीदूत नेहरू' या पुस्तकाचे लेखक - पां. वा. गाडगीळ

77. 'डिव्हाइन लाइफ' हे पुस्तक स्वामी शिवानंदांनी लिहिले.

78. 'अ स्ट्रेंजर कॉल्ड आय' हे पुस्तक प्रीतीश नंदी यांनी लिहिले.

79. 'अग्नीपरीक्षा' चे लेखक- आचार्य तुलसी

80. 'जॉब फॉर मिलियन्स' या पुस्तकाचे लेखक-व्ही. व्ही. गिरी

81. 'भारत-भारती' चे लेखक मैथिलीशरण गुप्त आहेत. 

82. 'दि ब्रोकन विंग्ज' चे लेखक- सरोजिनी नायडू

83. 'माझे स्वर माझे जीवन' हे पुस्तक पंडित रविशंकर यांनी लिहिले. 

84. 'माऊंटबॅटन ॲण्ड पार्टीशन ऑफ इंडिया' या पुस्तकाचे लेखक- कॉलिन्स व लॅपिरे 

85. 'कर्टन रेझर्स' या पुस्तकाचे लेखक- नटवरसिंग

86. 'द बुक ऑफ इंडियन बर्डस' हे पुस्तक डॉ. सलीम अली यांनी लिहिले.

87. 'दि परफेक्ट वे' हे पुस्तक आचार्य रजनीश यांनी लिहिले.

88. 'कायाकल्प ' हे साहित्य मुंशी प्रेमचंद यांनी लिहिले.

89. ' कामसूत्र' हे वत्सायान यांनी लिहिले.

90.' पंचतंत्र' हे पुस्तक विष्णू शर्मा यांनी लिहिले.

91. 'वीरांगना' हे पुस्तक मैथिलीशरण गुप्त यांनी लिहिले.

92. 'भारत भारती 'हे पुस्तक मैथिलीशरण गुप्त यांनी लिहिले.

93. 'गोरा' ही कादंबरी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली.

94. 'गोदान ' हे साहित्य मुंशी प्रेमचंद यांनी लिहिले.

95. 'बुद्ध चरितम 'हे साहित्य अश्वघोष लिहिले.

96. 'मालती माधव ' हे पुस्तक भवभूती यांनी लिहिले.

97. 'दुर्गेश नंदिनी ' हे पुस्तक बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

98. 'रत्नावली' हे पुस्तक हर्षवर्धन यांनी लिहिले.

99. 'चित्रा ' हि पुस्तक रवींद्रनाथ टागोरांनी लिहाले.

100. 'कुलियात ' हे पुस्तक मिर्झा गालिब यांनी लिहिले.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुस्तके व लेखक

Maharashtra's Famous Books and It's Author 



1. 'भावार्थदीपिका' हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला.

2. 'मिताक्षरा' ही मनुस्मृतीवरील टीका विज्ञानेश्वरांनी लिहिली.

3. 'दासबोध' हा ग्रंथ रामदासांनी लिहिला. 

4. 'मनाचे श्लोक' रामदासांनी लिहिले.

5. मरातीतील पहिली सामाजिक कादंबरी ' यमुना पर्यटन' बाबा पद्ममजीनी लिहिली.

6. 'ब्राह्मणांचे कसब' हा ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला. 

7. 'गुलामगिरी' हे पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिले.

8. 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिले.

9. 'अस्पृश्यांची कैफियत' हा ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला.

10. 'तृतीय रत्न' या पुस्तकाचे लेखक- महात्मा फुले

11. 'शेतकन्यांचा आसूड' हा ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला.

12. 'सुबोध रत्नाकर' हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुलेंनी लिहिला. 

13. ' दिग्दर्शन ' हे मासिक बाळशास्त्री जांभेकरांनी चालविले.

14. 'मराठी सत्तेचा उदय' हे पुस्तक न्या. रानडेंनी लिहिले.

15. गोपाळकृष्ण गोखले यांनी 'हितवाद' हे दैनिक सुरू केले.

16. 'निबंधमाला' विष्णुशास्त्री चपळूणकरांनी सुरू केली.

17. 'सुधारक' या साप्ताहिकाच्या इंग्रजी आवृत्तीचे गो. कृ. गोखले होते.

18. 'मराठा' या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक - लोकमान्य टिळक

19. 'डोंगरीच्या तुरूंगातील १०१ दिवस' हे पुस्तक सुधारक आगरकरांनी लिहिले.

20. 'शतपत्रे' भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वर्तमानपत्रात छापण्यात आली. 

21. 'शतपत्रे ' गो. ह.देशमुखांनी लिहिली. 

22. 'हॅम्लेट' ह्या नाटकाचे मराठीत भाषांतर सुधारक आगरकरांनी केले.

23. 'भारतीय राज्यघटनेचे' लेखक - डॉ. आंबेडकर 

24. 'द अनटचेबल्स' हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी लिहिला.

25. 'काळे पाणी' चे लेखक स्वा. सावरकर आहेत. 

26. 'माझी जन्मठेप' हा ग्रंथ स्वा. सावरकरांनी लिहिला.

27. "श्यामची आई' हया कादंबरीचे लेखक- साने गुरुजी 

28. 'कृष्णाकाठ' हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे.

29. 'एकच प्याला' व 'भावबंधन' ही नाटके रा. ग. गडकरींनी लिहिली. 

30. 'शारदा' चे लेखक गोविंद बल्लाळ आहेत.

31. 'संशयकल्लोळ' गोविंद बल्लाळांनी लिहिले.

32. 'पाणिग्रहणचे' लेखक- आचार्य अत्रे 

33. 'कऱ्हेचे पाणी' या पुस्तकाचे कर्ते - आचार्य अत्रे

34. ग. दि. माडगूळकरांनी 'गीत रामायण' लिहिले.

35. 'श्रीमान योगी' ही कादंबरी रणजित देसाईंनी लिहिली.

36. 'स्वामी' ही कादंबरी रणजित देसाईंनी लिहिली. 

37. 'मंदारमालाचे' लेखक-विद्याधर गोखले 

38. 'बलुतं' हे पुस्तक दया पवारांनी लिहिले.

39. 'मृत्युंजयचे' लेखक शिवाजी
 सावंत आहेत. 

40. 'लढत' हे चरित्र शिवाजी सावंतांनी लिहिले.

41. 'लढत' हे पद्मश्री विखे पाटलांचे आत्मनिवेदनात्मक पद्धतीने लिहिलेले चरित्र आहे.यांची 

42. 'गारंबीचा बापू' व 'तुंबाडचे खोत' हया पुस्तकाचे लेखक- श्री. ना. पेंडसे 

43. 'घणघणातो घंटानाद' हे पुस्तक पु. ल. देशपांडेंनी लिहिले.

44. 'बटाट्याची चाळ' व 'खोगीरभरती' या विनोदी लेखसंग्रहाचे लेखक- पु. ल. देशपांडे

45. 'सखाराम बाईंडर' चे लेखक विजय तेंडूलकर 

46. 'कन्यादान' चे लेखक - विजय तेंडूलकर

47. 'गर्द' हे पुस्तक अनिल अवचटांनी लिहिले. 

48. 'आनंदी गोपाळ' या पुस्तकाचे लेखक श्री. ज. जोशी

49. नारायण सुर्वेनी 'ऐसा गा मी ब्रम्ह' हा काव्यसंग्रह लिहिला. 

50. डॉ. केतकरांनी 'मराठी ज्ञानकोष' लिहिला.

51. 'नारायणी' हा ना. ग. गोरेंच्या निवडक लेखांचा संग्रह आहे.

52. 'क्लोरोफॉर्म' ह्या पुस्तकाचे लेखक अरूण लिमये

53. 'फ्रॉम रिव्हेली टू रिट्रिट' हे ले. ज. थोरातांचे आत्मचरित्र आहे. 

54.'बहिनी' हे पुस्तक मो. ग. रांगणेकरांनी लिहिले.

55. 'आयडॉल्स' या पुस्तकाचे लेखक- सुनिल गावस्कर 

56. 'सनी डेज' हे पुस्तक सुनिल गावस्करने लिहिले.

57. 'उपरा' हे पुस्तक लक्ष्मण मानेंनी लिहिले.

58. 'हाकी-हाडवळा' हे पुस्तक नामदेव ढसाळांनी लिहिले.

59. "नटसम्राट'चा लेखक- कुसुमाग्रज

60. 'स्वराज्याचा शत्रु' या पुस्तकातून साम्राज्यशाही विरूद्ध वैचारिक लढा माधवराव बागलांनी दिला. 

61. व्यंकटेश माडगुळकरांना 'सत्तांतर' या पुस्तकाबद्दल साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

62. '1857 चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले.

63. 'एकच प्याला' हे राम गणेश गडकरी यांनी लिहिले.

64. 'गीताई ' हे आचार्य विनोबा भावे यांनी लिहिले.

65. 'माझे विदयापीठ ' हे पुस्तक नारायण सुर्वे यांनी लिहिले.

66. 'एकटा जीव' हे दादा कोंडकेचे आत्मचरित्र आहे

Tuesday 11 April 2023

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११ , इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०), महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८९० या साली मिळाली. शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहला.
बालपण आणि शिक्षण
जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
शैक्षणिक कार्य
महात्मा फुल्यांच्या कवितेतल्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

“ विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।”
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली. जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले (?) भारतीय होत.सत्यवर्तन करणारे म्हणावे .

स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात , परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणार्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .

महात्मा फुले यांनी मानवास सत्यधार्माचा जो बोध केला त्यातील हि काही वचने आपण वाचली कि लक्ष्यात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणार्या माणसाला माणूस म्हनून प्रतिष्टा देणारा धर्म साकार करायचा होता . त्यासाटी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडऊन आणायचा होता .त्यासाटी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे . अखंड या काव्यप्रकारात त्यांनी मानवाचा धर्म , आत्मपरीक्षण , नीती , समाधान , सहिष्णूता , सदसदविवेक , उद्योग , स्वच्छता , गृहकार्यदक्षता , इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे . ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले , मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला , त्यातील काही निवडक भाग येथे विचारात घेतला पाहिजे . ज्योतीराव आपल्या अखंडात म्हणतात ,
सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||
न्यायाने वस्तूंचा उपयोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२||
धर्म राज्य भेद मानवा नसावे || सत्याने वर्तावे || ईशासाटी ||३||
सर्व सुखी व्हावे भिक्षा जी मागतो || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||
दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे || भिक्षान्न मागावे || पोतापुर्ते ||१||

खरी हीच नीती मानवाचा धर्म || बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४||



सत्याविन नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||१||



सत्य सोडू जाता वादामध्ये पडे | बुद्धीस वाकडे || जन्मभर ||२||



सत्य तोच धर्म करावा कायम || मानवा आराम || सर्व ठायी ||३||



मानवांचा धर्म सत्य हीच नीती || बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४||



सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता ||



जेथे आहे ||१|| जेथे जागा धीर सदा हृदयात ||



सत्य वर्तनात | खर्ची द्यावा ||२||



पिडा दु:खे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामागी ||३||



धीर धरूनिया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४||

श्रावण

*श्रावण....🔸* *तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे स...