Wednesday 15 February 2023

14 फेब्रुवारी

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*१४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा मध्ये
 शहीद जवानांना शब्दरूपी भावपुर्ण आदरांजली*🙏🏻🙏🙏


*ईश्वर ,अल्लाह तेरे नाम सबको सन्मती दे भगवान I*


पुलवामा येथे झालेल्या आंतकी हल्ल्याने मन खिन्न झाले .
    कशासाठी हा रक्तपात ?
ह्या प्रश्नाने मन उदास होते  . खरंच कशासाठी हा रक्तपात
काश्मीरसाठी ?
हे मानवा मृत्यूनंतर तू काय घेऊन जाणार आहेस
कांहीच नाही ना !
मग हे कशासाठी ?
माझे माझे सर्व येथे ची राहिले . ह्या अगोदर आपले पुर्वज मृत्यूनंतर काय घेऊन गेले का? नाही ना ! 

*सजन रे ! झूठ मत बोलो* 
*खुदा के पास जाना है I*
*ना हात्ती , ना घोडा है I*
*वहाँ पैदल ही जाना है ।*

*हे जीवनाच अंतिम सत्य आहे .*
मग आपण काय घेऊन जाणार आहोत . जाताना फक्त एकच गोष्ट आपल्यासोबत येणार आहे ती म्हणजे माणुसकी .
धर्माच्या नावाखाली युवा पिढीला चुुकीचा मार्गदर्शन केले जात आहे . म्हणे 

*आतंकवाद केल्यास जन्नत मिळते .* *स्वर्गातील अप्सरा सेवा करतात .*
*सबकुछ झूठ है I*

तरूणाईने विचार करायला हवा . खरंच स्वर्ग असेल का ? अप्सरा असतील का ? 
आपल्या आईवडिलांशी कधी खोटे बोलू नका . काबाडकष्ट करून तुम्हाला लहानाच मोठं केलं ते ह्यासाठी . म्हणजे आतंकवाद करण्यासाठी ?निष्पाप लोकांचा बळी घेण्यासाठी ?
     खरा स्वर्ग जर कोठे आहे तर तो आपल्या आसपास , माणसामाणसाच्या मनात , आई वडिलांच्या सेवेत , आपल्या कार्यात आपल्या वर्तणूकीत , माणुसकीत .

   मानव जन्म एकदाच येतो . कोणी पाहिले आहे दुसरा जन्म नाही ना !
म्हणूनच 
*ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे .*
 गीतकार मंगेश पाडगांवकर यांचे गीत .
खरचं ह्या जन्मावर माणसाने प्रेम केले पाहिजे तसेच जगण्यावर वर ही प्रेम केले पाहिजे .
  जातीयवाद समुळ नष्ट करू.झाले गेले सर्व कांही विसरूयात पुन्हा नव्याने आनंदाने राहूयात . फक्त आणि फक्त एकच जात ती म्हणजे मानवता एकच धर्म मानवता . धर्माच्या नावाखाली करत असलेलाआतंकवाद थांबवा . रक्तापात थांबवा अन्यथा सर्वनाश अटळ आहे . अजूनही वेळ गेलेली नाही . आपल्या घरी परत या ! आपल्या वडिलांच्या चरण सेवेत स्वर्ग आहे . तो स्वर्ग पहा आपल्या कर्मात सर्व सुख आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा .
प्रेम ह्या दोन शब्दातच स्वर्गाचे सुख आहे . माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागवावे .
*खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम शिकवावे .*
 साने गुरुजींची प्रार्थना .
परवा झालेल्या पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड हल्ला पाहून मन खिन्न झाले . मनामध्ये आलेले असंख्य विचार कागदावर मांडले आहेत मी कांही मोठी विचारवंत लेखिका कवयित्री नाही , मला जे वाटलं ते लिहलं वरील सर्व लेखाचा विचार करा आपले जीवन सुधारा हिच ईश्वर , अल्लाह चरणी प्रार्थना
*ईश्वर ,अल्लाह तेरे नाम सबको सन्मती दे भगवान I*

*भारत माता की जय*
*जय हिंद जय भारत*

1 comment:

श्रावण

*श्रावण....🔸* *तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे स...