Monday, 3 February 2025

 माघ पंचमीला |जन्म तुकोबांचा|

क्षण आनंदाचा |सृष्टी वर ||


माय बाप किती |पहा भाग्यवान|

संताचा तो मान |पुत्रा मिळे||


विठ्ठलाची भक्ती |ओढ अंतरात |

विठ्ठल मुखात |सदोदीत||


वृक्ष वल्ली आम्हा |सगे नी सोयरे|

विधान हे खरे |जीवनात|| 


दिला उपदेश |भक्तीचा सोहळा|

भाव जरी भोळा |श्रद्धा मनी||


तुका म्हणे भक्ता |संसार करता|

भक्तीत रमता |हर्ष मनी||


तुकाराम गाथा |जीवनाचा सार|

मिळेल आधार |सकलास|| 


संत शिरोमणी |तुकाराम झाले|

वैकुंठास गेले |विमानात||


शब्दांची सुमने |वाहीली चरणीं|

आज ही अनुश्री| मनोभावे||

Saturday, 4 January 2025

*हरवला आहे ... "आनंद "*

मी पेपर उघडला,,!!
त्यात मीच दिलेली
जाहिरात होती...

*हरवला आहे ... "आनंद "*
पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद ...

रंग ... दिसेल तो
उंची ...भासेल ती

कपडे सुखाचे
बटण दुःखाचे...

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून
थकलो आहोत सगळीकडे शोधून...

"आनंदा " परत ये,
कुणीही तुझ्यावर रागवणार नाही
तुझ्यावर कसलीही सक्ती करणार नाही...

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट
दार उघडं ठेवलंय वाढून ठेवलंय आशेचं ताट...

शोधून आणणाऱ्याला दिलं जाईल इनाम
मग म्हटलं आपणच करावं हे काम ...

*काय आश्चर्य ...*
 *सापडला की गुलाम ...*

जुन्या पुस्तकाआड,,
जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड...

आठवणींच्या मोरपिसात,,
अगरबत्तीच्या मंद वासात...

हवेच्या थंडगार झुळूकेत ,,
लाटांच्या हळुवार स्पर्शात...

अवेळी येणाऱ्या पावसात,,
प्राण्यांच्या मखमली स्पर्शात ...

त्यानेच मारला पाठीत धप्पा,,
जुन्या मित्र मैत्रिणीशी मारताना गप्पा...

मी म्हटलं अरे , 
इथेच होतास ,
उगाच दिली मी जाहिरात
तो म्हणाला वेडी असता तुम्ही माणसं,
बाहेर शोधता .. .
मी असतो तुमच्याच मनात ... !


😊😊😊

Friday, 3 January 2025

क्रांती ज्योती सावित्रीबाई


क्रांती ज्योती सावित्रीबाई 
ओव्या 

पतीच्या साथीने माये,तूही खंबीर झालीस
वसा शिक्षणाचा घेऊन, ज्ञानाने पूढे पूढे गेलीस

माय माझ्या सावित्रीने, ज्ञान ज्योत पेटवली
तुझ्या महान कार्यांन ,मान स्त्रीची उंचावली

वसा शिक्षणाचा देऊन ,लढा दिला संघर्षाला
आळा घातला रुढींना ,क्रुर अशा त्या चालीला

दिली सात ज्योतीबाला, खंबीर अशी पाठीशी
भृणहत्या , बालविवाह बंद, एकनिष्ठ तत्वांशी

केले मोकळे आकाश, उंबरठ्यामधले मायीने
स्त्री जीवन झाले पावन, दिले पंख शिक्षणाने 

माये तुझ्या ऋणामधे, माय लेकी सा-या जणी
लीन तुझ्या चरणाशी, झालो सुखी समाधानी 

थोर उपकार माऊलीचे, न फिटणारे ऋण 
दिले पंखात बळ, अभिमान तुझा मनोमन

माझे ग नमन हे ,सावित्री तुझ्या चरणाशी
शिक्षणाचा तुझा वसा , एकनिष्ठ मी त्याशी

Tuesday, 6 August 2024

श्रावण

*श्रावण....🔸*

*तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर...  'दिव्याची आवस' म्हणून जाड कणिक केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप... म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल .....!!*

*डबा भर चिरलेला पिवळा धम्मक गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पुड, उपासाची भाजणी राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर .....!!*

*जिवतीचा फोटो, कहाण्यांच पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र , दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा, आघाडा, फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन .....!!*

*श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वडया, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हारोळ्याचे लाडू, भोपळयाचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.. श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध .....!!*

*श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनीकडे झालेलं सवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर.. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण .....!!*

*श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार... श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं धुप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण जाई जुई तगर जास्वंद बेल दुर्वा पत्री तुळस यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं आंगण..... !!*

*श्रावण म्हणजे हिरवा ऋतु... या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.. कांकणांची किणकीण, काचेचा चुडा, हातावरची मेंदी, जरी काठाच्या साड्या, केसांत जुईचा गजरा, पायी जोडव्यांचा आवाज, गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानांत कुड्या आणि पायांत पैंजण.. म्हणजेच घरातही भेटणारा, सजवणारा श्रावण..... !!*

*श्रावण म्हणजे आठवणींची सर...*

*श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल.....*

*श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण, तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण.....*

*श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि तिने आग्रहानं खावू घातलेली पुरणाची मऊसूत पोळी.....*

*श्रावण म्हणजे देव्हाऱ्यांत समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप.....*

*श्रावण म्हणजे आई...*
 *तुझ्या आठवणींचा पाऊस .....!!!* 
 *काल पासून सुरू झालेल्या श्रावण*
 *मासाच्या सर्वांना शुभेच्छा🙏* 
 *आवडले म्हणून धाडले*

अनामिक

*अनामिक*......


ओठावरून अलगद लिपस्टिक फिरवली ! आणि मी आरशामध्ये पाहिलं .
 आज मला मुलींच्या कॉलेजला जायचं होतं. तेही फॅशन डिझाईनच्या कॉलेजमध्ये .
स्पर्धेच्या युगात अन फॅशनच्या जगात ! 
फॅशन , स्पर्धा अपरिहार्य आहे.याची पुसटशी जाणीव झाली. म्हणून मीही स्वतःलाच पुन्हा पुन्हा निरखून पाहिलं. आणि आज मला तर कॉलेज तरुणी सोबत संवाद साधायचा होता. त्यामुळे किमान थोडे तरी टापटिप असावे ! एवढाच माझा माफक उद्देश होता. त्यामुळे आरशात मी स्वतःला पुन्हा एकदा न्याहाळल. सर्व काही ओके आहे हा अंतर्मनाचा कौल मिळाला .
अरेच्चा ! 
उशीर होतोय मला.
लक्षात येताच भरभर आवराला सुरुवात केली. अकरा पर्यंत मला तिथे पोहोचायला हवं होत.
 पर्समध्ये आवश्यक ते सर्व काही आहे का, पुन्हा एकदा खात्री केली.
 आज नेमकं घरात कोणीच नव्हतं. त्यामुळे परत एक जबाबदारी जास्तीची.
 याचं लॉक , त्याचं लॉक !
पुन्हा तेच लावलेले लॉक ओढून पाहायचं !
कुठल्या राशीची ही लक्षण देव जाणे.माझ्याच राशीची बहुतेक असतील काय !
आहेतच.
 पुन्हा एकदा लावलेल कुलूप ओढून खात्री केली. आणि भरकन पर्स खांद्याला लटकवली.
 पुन्हा लक्षात आलं किचनमध्ये एकदा डोकावायच राहिलंच की !
मी पुन्हा किचनमध्ये परीक्षेच्या मॉडरेटर सारखी नजर फिरवली.
आणि तेवढ्या घाई गडबडीत सुद्धा समाधानाचा एक सुस्कारा सोडला. सगळं काही व्यवस्थित आवरून झालं होतं. सगळे लाइट्स ऑफ आहेत का पाहिलं. घाईगडबडीत आणि माझ्या धांदरटपणात काही राहायला नको म्हणून कायम मी दक्ष असते.
 विनाकारण आपल्या बाहेरच्या गोष्टीचा घरातल्या कुठल्याच गोष्टीवर परिणाम होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी लागते.
 पुन्हा एकदा सगळं काही ओके असल्याची खात्री झाली. घराचं मुख्य दार बंद केल्यावर लक्षात आलं , पाण्याची भरलेली बॉटल घरात टेबलवरच विसरले.
हुश्श....
किती आवरा ,थोडी का होईना घाई गडबड होतेच .मग आता काय करायचं ? 
करायचं म्हणजे ,पुन्हा इतकी सगळी कुलप उघडायची अन लावायची !
छे ! छे ! नको यात वेळ घालवायला.
 आता मला कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळेच बंधन पाळायला हवं .
 पुन्हा आज तर मी मुलींच्या महाविद्यालयात, मुलींना मार्गदर्शन करायला जाणार होते!
 गेस्ट म्हणून उशिरा जाऊन बॅड इम्प्रेशन पडणं बरं नाही ! मी मनालाच बजावलं. घराच्या मुख्य गेट जवळ आले तर काळे कुट्ट ढग जमा झाले होते. वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता.जो मला घरात अज्जिबात जाणवला नव्हता. बरं झालं म्हणजे मला बाहेर गेल्यानंतर या गारव्यामुळे तहानच लागणार नाही तर ! या गोष्टीने मनाला दिलासा मिळाला.
 एवढ्यात टपोरी चार दोन थेंब थेट माझ्या गालाला भेटायला आली !
इश्श ! कधी नाही ते मी मेकअप केला होता त्यात लिपस्टिक सुद्धा !
  म्हटलं काय हा प्रकार ? आता कार्यक्रमाला उशीर होणारच. पण मला जायला हव होत . जवळ तर होतं ठिकाण .अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर .
मी ते टपोरे थेंब झेलत गाडी जवळ आले. टपोऱ्या थेंबाने क्षणात रौद्ररूप धारण केलं. टप टप थेंबाची बरसात सुरू झाली.
 स्कुटी आहे तेथेच सोडून मी परत आले. म्हटलं हा पाऊस तर आहे ! जाईल पाच दहा मिनिटात .बाहेरच थांबुयात .उगाच घराचे आता कुलूप नको उघडायला. म्हणजे पाऊस उघडला की लगेच कार्यक्रमालाही लवकर जाता येईल .
क्षणात पाऊस अडवा तिडवा कोसळायला सुरू झाला. मला पोर्चमध्ये सुद्धा थांबण अशक्य झालं .लहान मुलांला आईने माराव तसा तो पाऊस माझ्या अंगावर धावून यायला लागला. म्हणजे आता तर मेकअप सोबत माझी साडी सुद्धा भिजणार !
 मी मागे फिरत पटकन कुलूप काढलं .लक्षात आलं पाण्याची विसरलेली बॉटल तरी आता यानिमित्ताने घ्यावी.
 मी किचनच दार उघडलं .टेबल वरची बॉटल घेतली .बाहेर निघणार तोच माझं लक्ष पुन्हा एकदा किचन कडे गेल।
 की मघाशी मंद गॅसवर दुधाचे पातेलं ठेवलं होतं. आणि तो गॅस तसाच चालू होता ! बापरे !क्षणात माझ्या हृदयाची धडधड एकदम वाढली. मी पुन्हा पुन्हा नजर फिरवून पण गॅसची ज्योत छोटी चालू आहे हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. दूध तापवण्याची ती वेळ ही नव्हती. पण मी दूध गॅसवर ठेवलं होतं .
धडधडत्या छातीने हॉलमध्ये आले .पाऊस पूर्णपणे थांबला होता .वातावरण पूर्ण स्वच्छ झाल होत. पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला.
 दोन तीनच मिनिट झाले असतील . धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे मला आत यावं लागलं.अवघ्या दोनच मिनिटात पाऊस ज्या वेगाने आला त्याच वेगात गायब सुद्धा !
 मी पुन्हा पुन्हा सर्व रूमवर नजर फिरवून दरवाजा बाहेरून बंद केला .माझं हृदय अजूनही धडधडत होत. गॅस चालू राहण्याची अक्षम्य चूक माझ्याकडून घडली होती. बारीक गॅस होता. घरी यायला चार पाच तास तर सहज लागले असते.दूध उतू गेलं असत ! गॅस विझला असता.आणखी काय काय झालं असतं ?
 या कल्पनेन पुन्हा धडकी भरली. बाहेर गाडी जवळ आले .गाडीवरचे पाणी पुसलं. तर जसं काही दोन मिनिटांपूर्वी जणू काही घडलच नाही.इतकं स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण झालं होतं .
 मघाच्या पेक्षा आता जास्त छातीत धडधडायला लागल. कारण कुठली तरी अनामिक शक्ती आपल्या पाठीमागे नक्की असते .याचा साक्षात्कार मला झाला होता. त्या शक्तीनेच मला खेचून घरात आणलं. निमित्त मात्र पावसाच केलं   
आणि होणाऱ्या अनर्थापासून वाचवलं होत. 
मी हात जोडले. माझे डोळे घळघळ वहात होते .
""""""""""''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

Wednesday, 12 June 2024

*पुस्तके वाचण्याची ५१ कारणे*🍁

*पुस्तके वाचण्याची ५१ कारणे*

🍁  ☘️  📚 ✒️ 📚🍁 ☘️


*१.पुस्तके अधिक आत्मविश्वास वाढविण्यास/ वाटण्यास मदत करतात.*
*२.पुस्तके जगभर स्वस्तात प्रवास करण्यास मदत करतात.*
*३.पुस्तके तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करतात.*
*४.पुस्तके विचारांना अन्न देतात.*
*५.पुस्तके तुम्हाला हसवितात आणि विचार करायला शिकवितात.*
*६.पुस्तके तुम्हाला परिपूर्णतेकडे घेऊन जातात.*
*७.पुस्तके सर्जनशीलतेला चालना देतात.*
*८.पुस्तके लेखन प्रतिभा बाहेर आणतात.*
*९.पुस्तके संवाद साधण्यास मदत करतात.*
*१०.पुस्तके तुमची दृष्टी स्पष्ट करतात.*
*११.पुस्तके तुमची जिज्ञासा पूर्ण करतात.*
*१२.पुस्तके तुम्हाला अधिक निवडी करण्यात मदत करतात.*
*१३.पुस्तके तुम्हाला साहित्यिक प्रतिभा निर्माण करण्यास मदत करतात.*
*१४.पुस्तकांना शिकण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची आवश्यकता नसते.*
*१५.पुस्तके तुमचे लक्ष वेधून घेतात.*
*१६.पुस्तके ही फलदायी मनोरंजन आहे.*
*१७.पुस्तके कधीही,कुठेही वापरली जाऊ शकतात.*
*18.पुस्तके मनोरंजन देतात, जेव्हा इतर अपयशी ठरतात.*
*१९.पुस्तके तुम्हाला शक्तिशाली बनवितात.*
*२०. पुस्तके तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे 'का' आणि 'कसे' जाणून घेण्यास मदत करतात.*
*२१.पुस्तके तुम्‍हाला आनंद निर्माण करण्‍यात आणि पसरविण्‍यात मदत करतात.*
*२२. पुस्तके तुम्हाला वेळोवेळी हुशारीने प्रवास करण्यास मदत करतात.*
*२३.पुस्तके तुम्हाला तथ्ये आणि आकडेवारीसह अपडेट ठेवतात.*
*२४.पुस्तके प्रेम,आपुलकी आणि ज्ञान पसरवितात.*
*२५.पुस्तके उत्तम मित्र बनवतात.*
*२६.पुस्तके तुम्हाला बौद्धिक वातावरणात घेऊन जातात.*
*२७.पुस्तके तुम्हाला तुमच्या सभोवतालचे जग अनुभविण्यास मदत करतात.*
*२८.पुस्तके तुमच्या मनाचे मनोरंजन करतात.*
*२९.पुस्तके तुमचे क्षितिज विस्तृत करतात.*
*३०.पुस्तकं निसर्ग तुमच्या दारी घेऊन येतात.*
*३१.पुस्तकांमुळे 'व्यक्तिमत्वात बदल' होतो.*
*३२.पुस्तकांमुळे आकलन वाढते.*
*३३.पुस्तकांना कंपनी लागत नाही.*
*३४.पुस्तके ताणतणाव कमी करतात.*
*३५.पुस्तकांमुळे तुमच्या सभोवतालच्या लोकांशी आपलेपणाची भावना निर्माण होते.*
*३६.पुस्तके मानसिक आणि शारीरिक आराम देतात.*
*३७.पुस्तके संवादाचे साधन म्हणून काम करतात.*
*३८.पुस्तके ही बौद्धिकदृष्ट्या समाधानकारक क्रिया आहेत.*
*३९.पुस्तके आध्यात्मिक अनुभव देतात.*
*४०.पुस्तके भावनिक बळ देतात.*
*४१.पुस्तके तुमचा स्वाभिमान वाढवितात.*
*४२.पुस्तके तुमची कल्पनाशक्ती,तर्कशक्ती, विचारशक्ति,निर्णयशक्ती, स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात आणि प्रोत्साहन देतात.*
*४३.पुस्तके तुम्हाला हुशार आणि बुद्धिमान बनवतात.*
*४४.पुस्तके तुम्हाला बौद्धिक दृष्टया सक्षम करतात.*
*४५.पुस्तके तुम्हाला 'स्वप्नांच्या जगात' घेऊन जातात.*
*४६.पुस्तके तुमचे जीवन आणि दृष्टी बदलू शकतात.*
*४७.पुस्तकं 'आयुष्याचे ध्येय' साध्य करण्यात मदत करतात.*
*४८.पुस्तकांमुळे अद्भुत अनुभव येतो.*
*४९.पुस्तकं आयुष्य बदलतात.*
*५०.  पुस्तके प्रेरणा देतात, पुस्तके प्रोत्साहन देतात, पुस्तके राष्ट्र निर्माण करतात.*                                         *५१.पुस्तकं हे मस्तक सशक्त करते आणि सशक्त मस्तक हे चुकीच्या ठिकाणी नतमस्तक होत नसते.*    

📚📚🤝🙏🙏🤝📚📚

🌈🌹🙏🌹🌈

Thursday, 1 February 2024

खुशवंत सिंह

खुशवंत सिंह जीवनी 
जन्म: 2 फ़रवरी 1915, मृत्यु: 20 मार्च 20
खुशवंत सिंह भारतीय लेखकों और पत्रकारों में हर समय सर्वोपरि रहने वालों में से एक थे। उनका जन्म पाकिस्तान के हदाली में वर्ष 1915 में हुआ था। उनका निंधन 20 मार्च 2014 को 99 वर्ष की आयु में उनके निवास स्थान दिल्ली में ह्रदय गति रुक जाने के कारण हुई थी। वह भारत के प्रीमियम इतिहासकारों और उपन्यासकारों में से थे। साथ ही राजनीतिक टीकाकार, स्तंभकार और एक असाधारण पर्यवेक्षक के रूप में प्रसिद्ध थे एवं एक सामाजिक आलोचक के रूप में चर्चित थे। खुशवन्त सिंह (जन्म: 2 फ़रवरी 1915, मृत्यु: 20 मार्च 2014) भारत के एक प्रसिद्ध पत्रकार, लेखक, उपन्यासकार और इतिहासकार थे। एक पत्रकार के रूप में उन्हें बहुत लोकप्रियता मिली। उन्होंने पारम्परिक तरीका छोड़ नये तरीके की पत्रकारिता शुरू की। भारत सरकार के विदेश मन्त्रालय में भी उन्होंने काम किया। 1980 से 1986 तक वे राज्यसभा के मनोनीत सदस्य रहे।
खुशवन्त सिंह जितने भारत में लोकप्रिय थे उतने ही पाकिस्तान में भी लोकप्रिय थे। उनकी किताब ट्रेन टू पाकिस्तान बेहद लोकप्रिय हुई। इस पर फिल्म भी बन चुकी है। उन्हें पद्म भूषण और पद्म विभूषण से सम्मानित किया गया। उन्होंने अपना सम्पूर्ण जीवन एक जिन्दादिल इंसान की तरह पूरी कर्मठता के साथ जिया।
पारिवारिक विवरण
खुशवंत सिंह का परिवार एक धनी परिवार था। उनके पिता का नाम सर शोभा सिंह था जोकि एक बिल्डर और ठेकेदार थे। उनकी माता का नाम लेडी वर्याम कौर था। उनका विवाह कवल मलिक से हुआ था जिनसे एक पुत्र राहुल सिंह थे, और एक पुत्री माला थी। उल्लेखनीय है कि प्रसिद्ध फिल्म अभिनेत्री अमृता सिंह उनकी भतीजी थी जोकि उनके भाई दलजीत सिंह की पुत्री है।
शिक्षा
वह लन्दन में कैम्ब्रिज विश्वविद्यालय के किंग्स कॉलेज में स्थित इनर मंदिर में और लाहौर के गवर्नमेंट कॉलेज शिक्षा प्राप्त किये थे।
कैरियर
एक पत्रकार के रूप में भी खुशवन्त सिंह ने बहुत ख्याति अर्जित की। 1951 में वे आकाशवाणी से जुड़े थे और 1951 से 1953 तक भारत सरकार के पत्र 'योजना' का संपादन किया। 1980 तक मुंबई से प्रकाशित प्रसिद्ध अंग्रेज़ी साप्ताहिक 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ़ इंडिया' और 'न्यू डेल्ही' के संपादक रहे।1983 तक दिल्ली के प्रमुख अंग्रेज़ी दैनिक 'हिन्दुस्तान टाइम्स' के संपादक भी वही थे। तभी से वे प्रति सप्ताह एक लोकप्रिय 'कॉलम' लिखते हैं, जो अनेक भाषाओं के दैनिक पत्रों में प्रकाशित होता है। खुशवन्त सिंह उपन्यासकार, इतिहासकार और राजनीतिक विश्लेषक के रूप में विख्यात रहे हैं।साल 1947 से कुछ सालों तक खुशवन्त सिंह ने भारत के विदेश मंत्रालय में महत्त्वपूर्ण पदों पर कार्य किया। 1980 से 1986 तक वे राज्यसभा के मनोनीत सदस्य भी रहे।वर्तमान संदर्भों और प्राकृतिक वातावरण पर भी उनकी कई रचनाएं हैं। दो खंडों में प्रकाशित 'सिक्खों का इतिहास' उनकी प्रसिद्ध ऐतिहासिक कृति है। साहित्य के क्षेत्र में पिछले सत्तर वर्ष में खुशवन्त सिंह का विविध आयामी योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण है।

खुशवन्त सिंह ने कई अमूल्य रचनाएं अपने पाठकों को प्रदान की हैं। उनके अनेक उपन्यासों में प्रसिद्ध हैं - 'डेल्ही', 'ट्रेन टू पाकिस्तान', 'दि कंपनी ऑफ़ वूमन'। इसके अलावा उन्होंने लगभग 100 महत्वपूर्ण किताबें लिखी। अपने जीवन में सेक्स, मजहब और ऐसे ही विषयों पर की गई टिप्पणियों के कारण वे हमेशा आलोचना के केंद्र में बने रहे। उन्होंने इलेस्ट्रेटेड विकली जैसी पत्रिकाओं का संपादन भी किया।
व्यवसाय
1939-1947: वह उच्च न्यायालय, लाहौर में एक अभ्यासरत वकील थे।
1947: उन्होंने शीघ्र ही स्वतंत्र हुए भारत के लिए एक राजनयिक के रूप में सेवा की।
1951: उन्होंने ऑल इंडिया रेडियो के साथ एक प्रतिष्ठित पत्रकार के रूप में अपना कैरियर शुरू किया।
1951-1953: वह योजना पत्रिका के संस्थापक और संपादक भी थे।
1969-1978: वह वीकली आफ इंडिया, बाम्बे के संपादक भी थे।
1978-1979: वह नेशनल हेराल्ड के( नई दिल्ली) एडिटर-इन-चीफ भी थे।
1980-1983: वह हिंदुस्तान टाइम्स के संपादक थे।
उनका शनिवार को हिंदुस्तान टाइम्स में प्रकाशित "एक और सभी के प्रति द्वेष के साथ" स्तंभ (कालम) अब तक का सबसे अच्छी तरह से पसंद स्तंभों(कालमों) में से एक था।
ऑनर्स और पुरस्कार
1974 में वह भारत के राष्ट्रपति द्वारा पद्म भूषण से सम्मानित किए गए। हालांकि 1984 में उन्होंने भारतीय सेना के स्वर्ण मंदिर में घुसने और एक अभियान चलाने के कारण विरोध स्वरुप इस सम्मान को लौटादिया था।
वर्ष 2007 में, खुशवंत सिंह को पद्म विभूषण से सम्मानित किया गया।
वर्ष 2006 में उन्हे पंजाब सरकार द्वारा पंजाब रतन अवार्ड से सम्मानित किया गया।
जुलाई 2000 में उन्हें अपनी बहादुरी और ईमानदारी "प्रतिभाशाली तीक्ष्ण लेखन." के लिए सुलभ इंटरनेशनल सोशल सर्विस संगठन द्वारा "आनेस्ट मैन आफ द ईयर अवार्ड” दिया गया था। सम्मान समारोह के समय, आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री ने उन्हें "विनोदी लेखक और इश्वर के साथ-साथ मानव भलाई के लिए कट्टर आस्तिक और नास्तिक साथ ही एक देखभाल करने वाला और एक साहसी मन." वाले लेखक के रूप में वर्णित किया था।
2010 में उन्हे भारत के साहित्य अकादमी द्वारा साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्कार दिया गया था।
2012 में उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री अखिलेश यादव ने उन्हें अखिल भारतीय अल्पसंख्यक फोरम वार्षिक फैलोशिप का अवार्ड दिया गया था।
उन्हें आर्डर आफ खालसा (निशान- ए-खालसा) सम्मान दसे भी सम्मानित किया गया था।

उपलब्धियां

खुशवंत सिंह वर्ष 1986 से वर्ष 1980 तक राज्य सभा के सदस्य रहे। कांग्रेस पुस्तकालय उनके 99 कार्यों जोकि खुशवंत सिंह द्वारा किए गए है रखे हुए ह
किताबें और वृत्तचित्र
खुशवंत सिंह ने अपनी रचना कल्पना और अकल्पना दोनों वर्गों में की थी। वह मुख्य रूप से अंग्रेजी भाषा में लिखा करते थे। उनकी प्रमुख पुस्तकें ट्रेन टू पाकिस्तान (जिसका प्रकाशन 1953 में हुआ था) जोकि इंटरनेशनल अक्लेम और ग्रूव प्रेस अवार्ड पुरस्कार 1954 से पुरस्कृत थी। इस पुस्तक में 1947 में भारत और पाकिस्तान के विभाजन को दर्शाया गया है। उनका दूसरा प्रमुख काम भारत की इमरजेंसी पर निबंध के सन्दर्भ में ‘ह्वाई आई सपोर्ट इमरजेंसी’ (2004 में प्रकाशित) नाम से है। उनका तीसरा प्रमुख काम देल्ही:अ नावेल है। उन्होंने आई शैल नॉट हियर द नाईटेंगल (1959 में प्रकाशित) पुस्तक को भी लिखा है। पोर्ट्रेट आफ़ लेडी: कलेक्टेड स्टोरी एक लघु कहानी संग्रह के रूप में उन्होंने प्रस्तुत की थी।
उन्होंने महाराजा रणजीत सिंह और सिख साम्राज्य के पतन के अलावा भी कई अन्य पुस्तकें लिखी।
इनके अलावा, उन्होंने सिख इतिहास पर दो खंडों में एक क्लासिक किताब ‘हिस्ट्री आफ़ सिख’(1963 में प्रकाशित) लिखा था. उनके अन्य चर्चित कार्यों में ट्रुथ,लव एंड अ लिटिल मैलिस उनकी अत्मकथा के रूप में (2002 में प्रकाशित), सेक्स, स्कॉच एंड स्कालरशिप और इन द कम्पनी आफ ओमेन (1999 में प्रकाशित) है।
गौरतलब है कि 98 वर्ष की आयु में उनकी अंतिम लिखित द गुड,द बैड एंड द रेडीकुलस शीर्षक से थी। उन्होंने हुमारा कुरैशी के साथ कई पुस्तकों में सहलेखन कार्य किया था।
योगदान
साहित्य के क्षेत्र में उनका योगदान अतुलनीय था। उन्होंने अपने व्यंग्य लेखन के माध्यम से अपने पाठकों का भरपूर मनोरंजन किया था।
निधन
जाने माने पत्रकार और लेखक खुशवंत सिंह का 20 मार्च, 2014 गुरुवार को निधन हो गया। वह 99 वर्ष के थे और उनका जन्म पंजाब (अब पाकिस्तान) में वर्ष 1915 में हुआ था। वह लंबे समय से बीमार चल रहे थे। उनके पुत्र और पत्रकार राहुल सिंह के अनुसार उन्होंने सुजान सिंह पार्क स्थित अपने आवास पर अंतिम सांस ली। उन्हें सांस लेने में कुछ परेशानी थी। खुशवंत सिंह भारत के प्रसिद्ध पत्रकार, लेखक, उपन्यासकार और इतिहासकार थे। एक पत्रकार, स्तंभकार और एक बेबाक लेखक के रुप में उन्हें अंतरराष्ट्रीय ख्याति मिली और अनेक राष्ट्रीय एवं अंतरराष्ट्रीय पुस्कारों से सम्मानित भी किया गया। उन्हें पद्मश्री, पद्म विभूषण जैसे सम्मानों से भी सम्मानित किया जा चुका है। खुशवंत सिंह 'योजना', नेशनल हेराल्ड, हिन्दुस्तान टाइम्स और 'दि इलेस्ट्रेटेड विकली ऑफ़ इंडिया' के संपादक रहे थे। इनके अनेक उपन्यासों में सबसे अधिक प्रसिद्ध 'डेल्ही', 'ट्रेन टू पाकिस्तान', 'दि कंपनी ऑफ़ वूमन' हैं। वर्तमान संदर्भों और प्राकृतिक वातावरण पर भी उनकी कई रचनाएं हैं। दो खंडों में प्रकाशित 'सिक्खों का इतिहास' उनकी प्रसिद्ध ऐतिहासिक कृति है। लगभग 70 वर्ष साहित्य के क्षेत्र में खुशवंत सिंह का विविध आयामी योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण है। साल 1947 से कुछ सालों तक खुशवंत सिंह जी ने भारत के विदेश मंत्रालय में विदेश सेवा के महत्त्वपूर्ण पदों पर कार्य किया। साल 1980 से 1986 तक वे राज्यसभा के मनोनीत सदस्य रहे।
प्रमुख प्रकाशित पुस्तकें
उपन्यास-
दिल्ली (किताबघर प्रकाशन, नयी दिल्ली से)
पाकिस्तान मेल (राजकमल प्रकाशन, नयी दिल्ली से)
औरतें (राजपाल एंड सन्ज़, नयी दिल्ली से)
सनसेट क्लब (राजपाल एंड सन्ज़, नयी दिल्ली से)
टाइगर टाइगर (राजपाल एंड सन्ज़, नयी दिल्ली से)
बोलेगी न बुलबुल अब (राजपाल एंड सन्ज़, नयी दिल्ली से)
कहानी-
प्रतिनिधि कहानियाँ (राजकमल प्रकाशन, नयी दिल्ली से)
खुशवंत सिंह की सम्पूर्ण कहानियाँ (राजपाल एंड सन्ज़, नयी दिल्ली से)
आत्मकथा/संस्मरण-
सच, प्यार और थोड़ी सी शरारत (अनुवाद- निर्मला जैन) [राजकमल प्रकाशन, नयी दिल्ली से]
मेरे मित्र : कुछ महिलाएँ, कुछ पुरुष (किताबघर प्रकाशन, नयी दिल्ली से)
मेरी दुनिया मेरे दोस्त (राजपाल एंड सन्ज़, नयी दिल्ली से)
इतिहास-
सिखों का इतिहास (दो खंडों में, अनुवाद- उषा महाजन) [किताबघर प्रकाशन, नयी दिल्ली से]
अन्य-
मेरा लहूलुहान पंजाब (राजकमल प्रकाशन, नयी दिल्ली से)
सम्मान
भारत सरकार द्वारा साहित्य एवं शिक्षा के क्षेत्र में उल्लेखनीय योगदान के लिए उन्हें 1974 में पद्म भूषण और 2007 में पद्म विभूषण से सम्मानित किया



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि...