Thursday, 31 July 2025

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे




लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. ते मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारांचे होते. यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मांग जातीत झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालबाई होते. जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊंनी दोन विवाह केले. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे आणि दुसरी पत्नी जयवंता साठे होत्या. त्यांना तीन अपत्ये होती. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.[]

साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.

मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हणले

Wednesday, 30 July 2025

                                                   लगबग सणांची  श्रावणाला भारी

                                                   माहेरच्या मुळासाठी आसावती  पोरी

                                                      माहेरी रमते मी  मैत्रिणींच्या मेळ्यात 

                                                     उंच झोक्यासंगे चिंब भिजाव पावसात

                                                    लेकीला बघाया माय येडावलेली

                                                  सासरच क्षेम  विचारते खूशाली

                                                  श्रावणाची माया  नाही अंतरलेली

                                                   सासुरवशीणीची मन श्रावणाला भूललेली

                                                  श्रावणात पुजा मांडा महादेवाची 

                                                  दुर्वा ,आगरडा पाने वाहा बेलाची

                                                  महादेवाची आवडती फुले धोतर्याची

                                                  महालक्ष्मीला मान पानं नागवेलीची

                                                    झिमझिम पाऊस झिम्मा फुगडीत रंगतो

                                               हलक्या श्रावण धारानीं नभात खुलतो 

                                                 पीसारा सुंदर मोरमनीचा थुईथुई  नाचतो 

                                                   वृक्ष वेलींना प्रेमान अलिंगण देतो

                                           नटुनथटुन वारुळाला मांडता नागोबाची पुजा

                                              फुगडी , फेर ,नाच गाण्याची  झिम्मड  मजा

                                           चार दिवस तर पाठवले, ही वाटे मग  सजा

                                           घ्यायला यावं तर म्हणे मिळत नाही हो रजा!

                         

                                            अंगणात नव्या नवरींचीं गर्दी सजली 

                                        हिरवा चुडा , जरतारी साडी न् गालावर लाली

                                        सारी रात  सासरच्या हितगुजात मग जागली

                                         हिरव्या पानांआड केशर कळी फुलली

                                                        येता श्रावण तनू माझी मोहरते 

                                                        लाही सम कशी  तडकन फूलते

                                                          पौर्णिमेचा नारळ ,राखी बांधते

                                                          बंधुच्या औक्षणात आऊक मागते

                                                        मनातलं जळमट मी काढून टाकते

                                                       झोका, मेंदी, राखी मनात आठवते

                                                         हसर्या छबीची हळुच कळीच खुलते

                                                       मग मीच एक  धुंद श्रावण होऊन जाते

Tuesday, 22 July 2025

 


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, पत्रकार आणि लेखक होते. त्यांना "लोकमान्य" ही उपाधी जनतेने दिली, ज्याचा अर्थ "लोकांनी मान्य केलेला नेता" असा आहे. ते "लाल-बाल-पाल" या त्रिकुटापैकी एक होते. 
लोकमान्य टिळक यांच्याबद्दल अधिक माहिती:
  • जन्म आणि शिक्षण:
    बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (B.A., LL.B.) मिळवली.
  • स्वातंत्र्य चळवळीतील योगदान:
    टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांनी 'केसरी' आणि 'मराठा' वृत्तपत्रांद्वारे जनजागृती केली. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' ही त्यांची प्रसिद्ध घोषणा आहे.
  • राजकीय विचार:
    ते जहालमतवादी विचारसरणीचे होते आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध तीव्र लढा दिला. त्यांनी 'चतुःसूत्री' कार्यक्रम मांडला, ज्यामध्ये स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य यांचा समावेश होता.
  • सामाजिक कार्य:
    टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले, ज्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली.
  • लेखन:
    त्यांनी 'ओरायन' आणि 'श्रीमद्भगवद्गीतारहस्य' यांसारखी महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली.
  • मृत्यू:
    १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले.

  •  लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी देशासाठी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. 
  • 🙏🙏🙏🙏🙏

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती

मी अगदीच लहान होते तेंव्हापासूनच भांड्यांशी खूप मैत्री झाली. भांड्यांच्या स्वयंपाक घरातील कामापासून ते त्यांनी केलेल्या इतरही कामां पर्यंतच्या अनेक गोष्टी कानावर पडायच्या. म्हणजे," ती तुमची अमकी आहे ना ती अमक्याची ' चमची 'आहे.
तो ना.. अमक्याचा ' चमचा ' आहे." वगैरे वगैरे..
अजूनच जास्त ढवळाढवळ करणाऱ्याला पळी म्हणायचे. पण मग पळीचं पुल्लिंग काय?
 अशा पद्धतीचे काम करणाऱ्या पुरुषाला काय म्हणाव?... पळा?
 एकदा आई कोणाला तरी सांगत होती. मी असली चमचेगिरी इथं खपवून घेणार नाही. पुन्हा चमचा! 
कढई आणि कपाला कान असतात. स्वयंपाक घरातील इतर भांड्यांची कुजबूज आणि आम्ही बायका स्वयंपाक घरात जी कुचकुच करायचो ती पण ते ऐकत असतील का?
 अनेक गोष्टी सासरी आल्यानंतर नव्याने कळल्या. तेल ठेवलेल्या भांड्याला कावळा म्हणतात हे मला माहीत नव्हतं .
पण त्या पहिल्याच दिवशी सासुबाई नी सांगितलं," पोळ्यांना कावळ्याचं तेल लाव ."
(शी शी किती घाणेरडे सासर... उलटी येते अगदी... )
सासुबाई दक्षता समितीवर होत्या. इतरही अनेक समित्यांवर पदाधिकारी होत्या. त्यामुळे अनेक प्रकारच्या माणसांशी त्यांचा संपर्क यायचा.
" तो गुंड गॅसवर ठेव."
 म्हणल्यानंतर गॅसकडे जाण्या ऐवजी मी अंगणात पळाले. रस्त्यातल्या गुंडाला उचलून डायरेक्ट गॅसवर ठेवण्याची कल्पना म्हणजे लय भारी.. अगदी भन्नाट. परंतु गुंड हे भांड्याचे नाव आहे. हे कळल्यावर माझी फारच निराशा झाली. तसंच ' शकुंतला ' भांड्या बद्दल. त्यात आम्ही दही लावत असू. 
"फ्रिज मधलं ते शकुंतला काढ."
 म्हणल्यावर नक्की काय करायचं तेच कळेना.
पाणी पिण्याच्या जगात सर्व जग सामावलेलं असतं का ?
माहित नाही. पाणी म्हणजे जीवन म्हणून त्याला जग म्हणत असतील का?
असू द्या...
 आता माझ्या जगात म्हणजे स्वयंपाक घरात जायची वेळ झाली. घरातल्यांच्या पोटात कावळे ओरडायला सुरू करतील. पुन्हा कावळे.. अरे देवा !

 मराठी भाषा ही फारशी सोपी नाही.....!



*१. म्हणे "शिरा" खाल्ल्याने  "शिरा" आखडतात.


*२. "काढा" पिऊन मग एक झोप "काढा".


*३. "हार" झाली की "हार" मिळत नाही. 


*४. एक "खार" सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर "खार" खाऊन आहे.


*५. "पळ" भर थांब, मग पळायचे तिथे "पळ".


*६. "पालक" सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात  मेथी, "पालक" इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.


*७. "दर" वर्षी काय रे "दर" वाढवता...?


*८. "भाव" खाऊ नकोस, खराखरा "भाव" बोल.


*९. नारळाचा "चव" पिळून घेतला तर त्याला काही "चव" राहत नाही.


*१०. त्याने "सही" ची अगदी "सही सही" नक्कल केली.


*११. "वर" पक्षाची खोली "वर" आहे.


*१२. खोबर्‍यातला मुलांचा "वाटा" देऊन मग बाकीच्याची चटणी "वाटा".


*१३. "विधान" सभेतील मंत्र्यांचे "विधान" चांगलेच गाजले.


*१४. फाटलेला शर्ट "शिवत" नाही तोपर्यंत मी त्याला "शिवत" नाही.


*१५. भटजी म्हणाले, "करा" हातात घेऊन विधी सुरू "करा".


*१६. धार्मिक "विधी" करायला कोणताही "विधी" निषेध नसावा.


१७. अभियंता मला म्हणाला, इथे "बांध बांध".


*१८. उधळलेला "वळू" थबकला, मनात म्हणाला, इकडे "वळू" की तिकडे "वळू".


*१९. कामासाठी भिजवलेली "वाळू" उन्हाने "वाळू" लागली.


*२०. दरवर्षी नवा प्राणी "पाळत" मी निसर्गाशी बांधिलकी "पाळत" असतो.


*२१. फुलांच्या "माळा" केसांत "माळा".



मराठीची अवखळ वळणे...


*ज्यांना तोंडावर "बोलून टाकणं" जमत नाही ते पाठीमागे "टाकून बोलत"राहतात. 


*शहाणा माणूस "पाहून हसतो", निर्मळ माणूस "हसून पाहतो".


*काम सोपं असेल तर ते आपण "करून पाहतो", अवघड असेल तर "पाहून करतो".


*स्वयंस्फूर्त लेखक आणि उचलेगिरी करणारा उचल्या ह्यांच्यात फारसा फरक नसतो...


एकजण "लिहून बघतो" तर दुसरा "बघून लिहितो".


ही अशी सुंदर, लवचिक, अवखळ मराठी, नाही का? आता हेच बघा ना...

एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ...!😊


Monday, 21 July 2025

 पसारा नवा रोज मांडीत आहे


सागर किनारी लाटांचा खेळ 

युगेन युगे कसा चालत आहे

कधी येई भरती ओहोटी कधी

शंख शिंपल्याच्या पाडून राशी

पसारा नवा रोज मांडीत आहे


पर्वतात जन्मास येऊन सरीता

भेटीची ओढ सागराच्या आहे

दरी ,घळई कुठे  धबधबा तर

विशाल त्रिभूज प्रदेशांचा भूवरी

पसारा नवा रोज मांडीत आहे


पौर्णीमेच्या रात्री आकाशी चंद्र

हळूवार मार्ग क्रमीत आहे

पुर्णत्वाने प्रकटून गगनी कसा

निळ्या आकाशी  चांदण्याचा 

पसारा नवा रोज मांडीत आहे


वाहतोय वारा असा अविश्रांत

कधी सोसाट्याचा कधी शांत आहे

पाऊसधारा तो घेऊन येतो

अन् चराचरात चैतन्याचा

पसारा नवा रोज मांडीत जातो

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि...